नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

डॉ. आशिष देशमुख लिखित :- रणजीत देशमुख नावाचा बापमाणूस पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न.

रणजीतबाबू देशमुख यांनी हे दाखवून दिले आहे. सावनेरचा विकास श्री. रणजीतबाबू देशमुख यांनी केला. ते तत्वाने वागले. त्यांचे सुपुत्र डॉ. आशिष देशमुख हे राजकारण समजावून घेणारे, सर्व गुण संपन्न अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. वडिलांचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला आहे.

एका कर्तुत्ववान पुत्राने एका कर्तुत्ववान पित्याचे चरित्र लिहिले -- श्री. मधुकरराव भावे नागपूर दि.03ऑगष्ट :- डॉ. आशिष देशमुख लिखित रणजीत देशमुख नावाचा बापमाणूस पुस्तक प्रकाशन समारंभ संपन्न. श्री. मधुकरराव भावे, डॉ. रविंद्र शोभणे, डॉ. गिरीश गांधी, श्री. रणजीतबाबू देशमुख, श्री. शाम पेठकर ,ललीराव देशमुख सहीत अदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती. राजकारणातले सुसंस्कृत कुटुंब म्हणजे देशमुख कुटुंब. राजकारणात यश-अपयशाला महत्व नाही. किती जीवन जगले, यापेक्षा कसे जीवन जगले हे महत्वाचे आहे. रणजीतबाबू देशमुख यांनी हे दाखवून दिले आहे. सावनेरचा विकास श्री. रणजीतबाबू देशमुख यांनी केला. ते तत्वाने वागले. त्यांचे सुपुत्र डॉ. आशिष देशमुख हे राजकारण समजावून घेणारे, सर्व गुण संपन्न अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. वडिलांचा वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला आहे. त्यांनी इतिहासापासून धडा घेऊन व मोठे काम करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात. राजकारणाशिवाय इतर अनेक विषय असून बेरोजगारी, महागाई, गरिबीसारख्या अनेक समस्यांवर काम करून ते जनतेची मदतच करीत आहेत. त्यात त्यांना नक्कीच यश प्राप्त होणार. एका कर्तुत्ववान पुत्राने एका कर्तुत्ववान पित्याचे चरित्र लिहिले आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो , असे गौरवोद्गार मा.श्री. मधुकरराव भावे यांनी काढले.   माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आपले वडील मा.श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेतून “रणजीत देशमुख नावाचा बापमाणूस” हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ प्रेस क्लब सभागृह, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे सव्यसाची पत्रकार व महाराष्ट्रातील चालते-बोलते विद्यापीठ मा.श्री. मधुकरराव भावे यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध साहित्यिक मा.डॉ. रविंद्र शोभणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा.डॉ. गिरीश गांधी होते. मा.श्री. रणजीतबाबू देशमुख, सौ. रूपाताई देशमुख, डॉ. आयुश्री देशमुख यावेळी उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, नागपूर या पुस्तक प्रकाशन समारंभाचे आयोजक होते.  माझे पिता, महाराष्ट्राचे लाडके नेते श्री. रणजीतबाबू देशमुख यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस नुकताच २९ मे रोजी झाला. त्या अर्थाने हे त्यांचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. पप्पांच्या ऋणातून मुलगा म्हणून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही, मात्र त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्य मी अल्पसा प्रयत्न केला आहे. प्रेम, दरारा, चांगले वळण, जिव्हाळा, ध्येयवादी, खंबीर समाजसेवा अशा अनेक चांगल्या संस्कारांचा वारसा आपल्याला मिळाला असून मी स्वतःला भाग्यवान पुत्र समजतो. आत्मप्रौढी आणि स्वप्रसिद्धी यापासून श्री. रणजीतबाबू दूरच होते. म्हणूनच या महत्वाच्या वळणावर या खऱ्या अर्थाने ‘बाप माणसाचे’ आयुष्य साऱ्यांना कळावे म्हणून मी त्यांचे चरित्र लिहून काढण्याचा प्रयत्न केला. ते पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले आहे. ‘रणजीत देशमुख नावाचा बाप माणूस’ हे पुस्तक मी लिहून काढले आहे. अवघ्या महाराष्ट्रात त्यांच्यावर पिता म्हणून प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांचा प्रतिनिधी म्हणून मी ही अक्षरफुले त्यांच्या चरणी अर्पण केली आहेत, असे भावनिक प्रतिपादन ‘रणजीत देशमुख नावाचा बापमाणूस’ या पुस्तकाचे लेखक डॉ. आशिष देशमुख यांनी यावेळी केले. श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्य २०२१ मध्ये विविध आरोग्यविषयक व सामाजिक कार्य करण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.    डॉ. रविंद्र शोभणे म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, तत्वासाठी मंत्रीपदाचा त्याग करण्यास तयार असणारे, पूर्ण ताकदीने राजकारण करणारे श्री. रणजीतबाबू यांनी कृषी, ग्रामविकासावर भर दिला. त्यांच्यावर डॉ. आशिष देशमुख यांनी लिहिलेले हे पुस्तक खरे उतरले आहे.   डॉ. गिरीशजी गांधी म्हणाले, ”नागपूरच्या विकासाची खरी सुरुवात श्री. रणजीतबाबू देशमुख यांनी पालकमंत्री असतांना केली. एका राजकारण्याने एका निवृत्त राजकारणी पित्यावर पुस्तक लिहिले, हे पहिल्यांदाच घडले आहे. हे पुस्तक अप्रतिम आहे. आपल्या भूमिकेवर ठाम राहणारे श्री. रणजीतबाबू देशमुख यांच्यासारखे निष्ठावान आज दिसत नाहीत. डॉ. आशिष देशमुख हे भविष्यातील मोठे नेतृत्व आहे.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुस्तकाचे संपादक श्री. शाम पेठकर यांनी केले. या पुस्तकाचे प्रकाशक डॉ. आयुश्री आशिष देशमुख आहेत. कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. (दि.03 ऑगष्ट 2021)