नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन मागे

आमदारांसमोर सर्व परिस्थिती मांडली. आमदार समीर मेघेच्या मध्यस्थीनंतर अधिकाऱ्यांनी वर्दळीच्या ठिकाणी तात्काळ कामे करणार तसेच काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित निधीमधून रस्ते दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांचे धरणे आंदोलन मागे, नागपूर - हिंगणा (ता २५):- राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या कामात कंत्राटदार दिरंगाई करीत असून पाईपलाईन टाकताना खोदलेले रस्ते दुरुस्ती व खड्डे बुजविण्याचे सोडून दिले. पावसाळ्यात ह्याचा त्रास नागरिकांना होत असून कंत्राटदार ग्राम पंचायत मधील पदाधिकाऱ्यांचे ऐकायलाही तयार नाही. यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या मुख्य अभियंत्यांनी कार्यवाही करावी या मागणीसाठी डिंगडोह च्या सरपंचासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून बालाजी नगर चौकात सुरु केलेले धरणे आंदोलन आज अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. डिंगडोह व निलडोह येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत ४४ कोटींची नवीन नळयोजनेचे काम सुरु आहे. टाकीचे काम झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात नवीन पाईपलाईन टाकणे सुरु असताना डिंगडोह येथील सहा ही वॉर्डात जेसीबीच्या सहाय्याने पक्के सिमेंट रस्ते तोडून काही ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या तोडून पाईपलाईन टाकण्यात आली.पाईपलाईन टाकल्यानंतर त्या रस्त्याची दुरुस्ती करणे हे त्याच कंत्राटदाराचे काम आहे .मात्र थातुरमातुर पाईपलाईन च्या नाल्या बुजवून कंत्राटदाराने काम संपविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक ठिकाणी उरलेली माती रस्त्यावर पडून आहे, काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.तर अनेक ठिकाणी खुले पाईप रस्त्यावर उभे करून आहेत. पावसाळ्यात ह्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असून ग्राम पंचायत मधील पदाधिकाऱ्यांचे ह्याबाबत कंत्राटदार ऐकून घेण्यास तयार नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती देण्यात आली पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना माहिती दिली पत्रव्यवहार केला परंतु यावर काहीही कार्यवाही करण्यात आली नाही.याचा निषेध म्हणून येथील सरपंच इंद्रायणी काळबांडे,उपसरपंच कैलाश गिरी, ग्राम पंचायत सदस्य विनोद ठाकरे, बंडू भोंडे, प्रदीप इंगोले, राजेश बोरकर, हेमंत देशमुख, ज्ञानेश्वर कोकुडे, प्रिया वासनिक, सीमा शर्मा, मीना वानखेडे, रश्मी साबळे, ज्योती कथलकर, प्रजेश तिवारी, लता पांडे यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. आज आमदार समीर मेघे या धरणे मंडपात आले त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता सुशीलकुमार ,कार्यकारी अभियंता संतोष गव्हाणकर हे अधिकारी सुद्धा पोहचले स्थानिक लोकप्रतिनिधी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे,भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंबादास उके, माजी जि प सदस्य सुचिता ठाकरे ,राजू हरडे,अर्चना गिरी,माजी प स सद्स्य सुरेश काळबांडे,माजी सरपंच चेतनलाल पांडे यांच्यासह ग्राम पंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांसमोर सर्व परिस्थिती मांडली. आ मेघेच्या मध्यस्थीनंतर अधिकाऱ्यांनी वर्दळीच्या ठिकाणी तात्काळ डागडुजी करणार तसेच काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित निधीमधून रस्ते दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी वानडोंगरी येथील नगरसेविका अनिता गुप्ता,दक्षिणा कुंभलकर,अनिल शर्मा,महेश लोखंडे, रवींद्र जैन,शार्दूल कथलकर, राकेश उमाळे,संजय वानखेडे, काशिनाथ मापारी, बबन ठाकरे, विष्णू बानाइत,विजय सराड, निलेश कळंबे,दीपक सायखेडे,मोरेश्वर गायकवाड,राकेश यादव आदी हजर होते.(दि.26 ऑगष्ट 2021)