नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घ्याव्या,माजी उर्जामंत्री,आमदार चंद्रशेखर बावनकुळे

पुन्हा प्रभागरचना कराव्या, नंतरच निवडणुका घ्याव्या,अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली

नागपूर,दिनांक.8जुलै :- महाविकास आघाडीच्या काळात सर्व नेत्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मनपा, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायतमध्ये नियमबाह्य वाॅर्ड व प्रभागरचना केल्या. हजारो हरकती, सूचना डावलून स्वतःचे उमेदवार कसे निवडून येतील, अशा प्रभागरचना, जिल्हा परिषदेच्या गट, गणाच्या रचना केल्या. या चुकीच्या प्रभागरचनांची समिक्षा करावी, पुन्हा प्रभागरचना कराव्या, नंतरच निवडणुका घ्याव्या, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. प्रभागरचनेमध्ये दुरुस्तीशिवाय निवडणूक करू नये, सूचना, हरकतीचा विचार करून प्रभागरचना, गट गणाची रचना करावी, असे आमदार बावनकुळे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घ्याव्या, अन्यथा त्या राजकीय होतील, असेही आमदार बावनकुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावात या प्रभागरचना, गट गण रचना करण्यात आली. अशा पद्धतीने निवडणूक झाल्यास निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग होईल. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषदेतील गट, गण रचना निवडणूक आयोगाने रद्द कराव्या. जिल्हा परिषदेत गट, गण करताना चुकीच्या गावांचा समावेश करण्यात आला. या सदोष रचना रद्द करण्यात याव्या, अशी मागणी केल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले. (दि.8जुलै 2022)