नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

घुमरे, तेलंग व अड्याळकर आदींना श्रद्धांजली

नागपूर, १६ सप्टेंबर दै. तरुण भारतचे माजी मुख्य संपादक व कथालेखक दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे, माजी मुख्य संपादक वामनराव तेलंग यांना आज प्रेस क्लबमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

नागपूर, घुमरे, तेलंग व अड्याळकर आदींना श्रद्धांजली नागपूर, १६ सप्टेंबर दै. तरुण भारतचे माजी मुख्य संपादक व कथालेखक दिगंबर भालचंद्र उपाख्य मामासाहेब घुमरे, माजी मुख्य संपादक वामनराव तेलंग यांना आज प्रेस क्लबमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. लक्ष्मणराव जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत ज्येष्ठ पत्रकार मेघनाद बोधनकर, पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीश बोरकर, ब्रह्माशंकर त्रिपाठी व सुरेश अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते. लक्ष्मणराव जोशी म्हणाले की, मामासाहेब घुमरे, वामनराव तेलंग व हरिशजी अड्याळकर हे तिघेही पत्रकार होते. अड्याळकर हे कुठल्याही वर्तमानपत्रात काम करीत नव्हते, नोकरी करीत नव्हते. परंतु आमच्या दृष्टीने ते सर्वार्थाने पत्रकार होते. सर्व वर्तमानपत्रांशी त्यांचा संपर्क होता. अचानक आघात करून हे तिघेही निघून गेलेत व आपल्या जीवनात पोकळी निर्माण करून गेले. त्यांचे जाणे जीवनाला चटका लावून जाणारे आहे. हरिश अड्याळकर सतत लोकांच्या संपर्कात रहात होते. ते गेल्यानंतर दुसèयाच दिवशी त्यांच्या मुलाचेही निधन झाले, हा त्यांच्या कुटुंबावर आघात होता. मामासाहेब घुमरे मला गुरुस्थानी होते, मार्गदर्शकही होते, माझ्या पाठीशी ते खंबीरपणे उभे होते. स्वतः मागे राहून ते  मला पुढे करीत. ते मला वडिलांच्या स्थानी होते. वामनराव मित्र होते. त्यांची दृष्टी विशाल, उदार होती. आलेले काम १०० टक्के चोख करीत. सुरेश भट त्यांचे चांगले मित्र होते. हरिश अड्याळकर, अशी माणसे दुर्मिळ आहेत. हरिश अड्याळकर म्हणजे डॉ. राम मनोहर लोहियाच. कृतीनेही, असे लक्ष्मणराव जोशी म्हणाले. मेघनाद बोधनकर म्हणाले की, मामा घुमरे, वामनराव तेलंग व हरिश अड्याळकर हे तिघेही आपापल्या क्षेत्रात जाणकार होेते. मामासाहेब घुमरे स्कॉलर संपादक होते. ते संपादकीय लिहित असले तरी संशोधन, अभ्यास करून लिहित. ते व मी वार्ताहर व एकाचवेळी संपादक झालो. वामनराव तेलंग माझे शेजारी. हरिश अड्याळकर परिश्रमी, जीव ओतून व झोकून काम करणारे होते. प्रदीप मैत्र म्हणाले की, हे तिघेही साधेपणाने जगले. त्यांचे जीवन तरुणांना आदर्शवत आहे. सुरेश अग्रवाल म्हणाले की, कोरोनाच्या संकटात या तिघांनाही आपण मुकलो. हे तिघेही साधेपणाने रहात. हरिश अड्याळकर अजब रसायन होते. स्वभाव, विचार व आचरणाने ते खरे लोहियावादी होते व त्यानुसारच ते जगले. मामासाहेब घुमरे, वामनराव तेलंग व हरिश अड्याळकर या तिघांचेही मार्गदर्शन आचरणात आणणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल, असे शिरीष बोरकर म्हणाले. प्रास्ताविक विश्वास इंदुरकर यांनी केले. दोन मिनिटे मौन पाळून तीनही महनीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचे कुटुंबीय व इतर मान्यवर उपस्थित होते.