नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल होऊन युवकांना संधी मिळणार - नाना पटोले

महाराष्ट्र प्रदेश चे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष राज्यात प्रथम क्रमांकाचा कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असून पक्षात सघटनात्मक बदल अपेक्षित आहे नवयुवकाना संधी देणार आहोत राज्यपाल नियुक्त विधान परिषद चे 12 सदस्य अजून पर्यंत नियुक्त झाले नाही याबाबत कोर्टात जाणार असल्याचे संकेत या माध्यमातून दिले

नागपूर दि.10फेब्रुवारी, काँग्रेस पक्षात संघटनात्मक बदल होऊन युवकांना संधी मिळणार - नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश चे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष राज्यात प्रथम क्रमांकाचा कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असून पक्षात सघटनात्मक बदल अपेक्षित आहे नवयुवकाना संधी देणार आहोत राज्यपाल नियुक्त विधान परिषद चे 12 सदस्य अजून पर्यंत नियुक्त झाले नाही याबाबत कोर्टात जाणार असल्याचे संकेत या माध्यमातून दिले, महाराष्ट्र प्रदेश चे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष राज्यात प्रथम क्रमांकाचा कसा होईल यासाठी प्रयत्न करणार असून पक्षात सघटनात्मक बदल अपेक्षित आहे नवयुवकाना संधी देणार आहोत राज्यपाल नियुक्त विधान परिषद चे 12 सदस्य अजून पर्यंत नियुक्त झाले नाही याबाबत कोर्टात जाणार असल्याचे संकेत या माध्यमातून दिलेमोदी सराकरने शेतकरी संबंधी जे ३ कायदे केले आहे ते कसे शेतकरी विरोधी आहे हे आम्ही महाराष्ट्रातील जनतेला विस्तारमध्ये सांगू,या कायद्यांचा परिणाम शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य जनता व मध्यम वर्गीयांवर मोठ्या प्रमाणावर होणार आहे.या कायद्यात अनेक त्रुट्या आहेत,पुढील काळात गरीब,सामान्य माणूसच संपेल. तांदूळ,गहूं,साखर,डाळी,तेल इ.वस्तूच या कायद्यांनी सामान्यांच्या अवाक्याबाहेर काढल्या,साठेबाजारीला प्रोत्साहन देणारे हे कायद्ये कोणाच्या हितासाठी केले हे जनतेला माहिती आहे,देशातील गरीबांना उपाशी मारण्याचे काम मोदी सरकारने केले,या कायद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातून दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळेल असे नाना पटोले म्हणाले.एकंरित तुमचा स्वभाव बघता तुम्ही या सरकारमध्येही ‘पंगे’घेणार का?यावर बोलताना काँग्रेस ही जनतेसोबत आहे,‘पंगा’हा आमचा शब्द नाही,स्वभाव ही नाही,याचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या कल्याणकारी योजनांसाठी स्वत: काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे,यावरुन काँग्रेस ही जनतेसोबत आहे सत्तेसोबत नाही असे विधान नाना यांनी केले. ते आज बुधवार दि. १० फेब्रुवारी रोजी प्रेस क्लब येथे पत्रकारांसाेबत आयोजित अनाैपचारिक वार्तामध्ये बोलत होते.यावेळी त्यांच्यासोबत आ.विकास ठाकरे,आ.अभिजित वंजारी,माजी मंत्री राजेंद्र मुळक,गिरीश पांडव,विशाल मुत्तेमवार,प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रश्‍नावर बोलताना मी काही भविष्यकार नाही फडणवीस हे भविष्यकार आहेत,असा टोला त्यांनी हाणला.‘सामना‘मध्ये होणा-या टिकेकडे लक्ष् वेधले असता माझे मित्र फडणवीस हे शिवसेनेसोबत सत्तेत असताना किती चिमटे घ्यायचे?याची जनतेला माहिती आहे असे सांगून आपापसात भांडायचेही आणि सत्तेही राहायचे निदान आम्ही या ‘स्तरावर’जाणार नाही,चिमटे घेण्याचे काम भाजपचेच असल्याचा ‘चिमटा’त्यांनी काढला. प्रदेशाध्यक्ष् बदलल्याने आता जुन्या लोकांनाही संधी राहील का?याचे उत्तर देताना आता नवीन पिढीलाही संधी राहील असे ते म्हणाले .महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’यशस्वी होईल का?असे विचारले असता ते लोटस आता‘चिमले’अशी कोटी त्यांनी केली.तुम्हाला नितीन राऊत यांचे उर्जाखाते मिळणार का?या प्रश्‍नावर मिश्‍कीली करीत मी दिल्लीतून काँग्रेस उपाध्यक्ष्ा सोनिया गांधी व युवा नेते राहूल गांधी यांच्याकडून ‘उर्जा’घेऊनच आल्याचे ते म्हणाले.आम्ही खूर्चीच्या उर्जेची चर्चा करीत नाही असाही टोला त्यांनी हाणला. महाराष्ट्रात काँग्रेस किती क्रमांकावर आहे?यावर बोलताना स्पष्टपणे काँग्रेस चौथ्या क्रमांकावर असल्याचे ते म्हणाले.आम्ही खोटं बोलत नाही,चुकीचे सांगत नाही असा टोला ही हाणला.तसे तर देशात ‘फेकू’कोण आहेत हे सर्वांनाच माहिती असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसचा उपमुख्यंत्री पदाबाबत दावा याबाबत विचारले असता अशी कुठलीही चर्चा नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात शिवसेना,राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसत आहे म्हणून तुम्हाल प्रदेशाध्यक्ष पदाची जवाबदारी दिली आहे का?असे विचारले असता आम्ही आहोत म्हणून मुख्यमंत्री आहेत,मुख्यमंत्री आहेत म्हणून महसूल मंत्री आहेत, आम्ही आमची सरकार असा उल्लेख करतो,माझी सरकार असे नाही,असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माझ्यावर संघटनप्रमुख म्हणून जी जवाबदारी सोनिया गांधी व राहूल गांधी यांनी सोवपली आहे त्याला बांधिल राहून महाराष्ट्रात पक्ष्ाचे संघटन पहील्या क्रमांकावर आणनार असल्याचे ते म्हणाले.सर्व पक्ष्ांना आपला पक्ष् वाढविण्याचा हक्क असल्याचे ते म्हणाले. पक्ष्ाची भूमिका काय असणार?याबाबत बोलताना मागच्या भाजप सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात ज्या काही चूका केल्या आहेत ते जनतेसमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशात मादी सरकारची वाटचाल ही सर्वस्वी हूकूमशाही ,एकाधिकारशाहीकडे सुरु असून जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला असल्याची टिका ही त्यांनी केली. राष्ट्रवादी-शिवसेनेच्या मंत्र्यांची कामगिरी आघाडी सरकारमध्ये जास्त सरस असून काँग्रेसच्या मंत्र्यांच्या कामगिरीसाठी तुम्ही काही शिक्ष्ा करणार का?या प्रश्‍नावर बोलताना माझे काम शिक्ष्ा देण्याचे नाही तर पक्ष्ाच्या संसदीय नेत्यांच्या बैठकीत अहवाल व कामगिरीचा लेखाजोखा देण्याचे असल्याचे ते म्हणाले.आमचे देखील मंत्री खूप चांगलं काम करीत आहे मात्र माध्मांमध्ये त्यांचे काम दिसत नसल्याची पुश्‍तीही त्यांनी जोडली. विज बिल माफीबाबत बोलताना काँग्रेस ही नेहमीच जनतेसोबत असते व राहील.मोदींनी लॉकडाऊनच्या काळात संपूर्ण देशातच कलम १४४ लागू केले व जनतेला बंदिस्त केले तरीही महाराष्ट्रातील जनतेचे विज बिल हे कसे कमी होऊ शकेल ही मागणी आम्ही रेटून धरु,असे ते म्हणाले. फडणवीस सरकारने राज्यात दिल्लीतील एकाधिकारशाहीप्रमाणे व्यवस्था निर्माण केली असल्याचा आरोप याप्रसंगी त्यांनी केला.अधिका-यांमध्ये अशी एकाधिकारशीहीची व्यवस्था निर्माण करण्याचे पाप फडणवीस यांनी केले असून मंत्र्यांचे कोणतेही काम अधिकारी करीत नाही.मीच विधान सभा अध्यक्ष पदी असताना सर्वप्रथम विधी मंडळात याबाबत औचित्याचा मुद्दा मांडला.एका महिन्याच्या आत उत्तरे सादर करण्याचे निर्देश ही दिलेत मात्र दुसरे अर्थसंकल्पाचे अधिवेशन आले तरी उत्तर मिळाले नाही.त्यामुळेच मुख्य सचिवांना स्वत: फोन लावला व अधिवेशनात वैयक्तिरित्या उपस्थित राहून उत्तर देण्याचे आदेश दिला मात्र उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्थी केली. मी तळागाळातला,जनतेचा माणूस असून संवैधानिक पदावर होतो तेव्हा ही त्यांचाच विचार केला.प्रशासकीय अधिकारी असोत,मुख्य सचिव किवा आम्ही, आम्ही जनतेचे नोकर आहोत ही माझी भूमिका आहे म्हणून मुख्य सचिवांनी सभागृहात येऊन माफी मागण्याचा आदेश दिला मात्र अजित पवार यांनी मध्यस्थी केली.विधान सभा अध्यक्ष् स्वत: ठराव आणतो हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहील्यांदा घडले असे सांगत गडकरी,फडणवीस खूर्चीवर बसले की विसरुन जातात मात्र ओबीसींची जनगणना ही जातीनिहाय व्हावी या संवैधानिक मागणीच्या ठरावाला एकमताने मंजुरी मिळाली. अर्णव गोस्वामी हा जरी देशातील काही लोकांसाठी राष्ट्रभक्त असू शकेल त्याच्याबाबत तसेस सर्वोच्च न्यायालयाची कुठलीही नोटीस विधी मंडळाने स्वीकारु नये असे देशपातळीवर तीन ऐतिहासिक निर्णय घेतले असल्याचे नाना यांनी सांगितले. विदर्भातील जिल्हा नियोजन निधीबाबत विचारले असता कुठलाही निधी कमी केला नसल्याचे ते म्हणाले.हा आरोपच चुकीचा असून मागच्या सरकारने स्कोपच वाढवला नाही.स्कोप न वाढवता इतरांच्या हक्काचा निधी चोरुन आणला,असा घणाघात त्यांनी केला.स्कोप वाढवला असता तर इमानदारीचा निधी कपात करण्याची कोणाची हिंमतच झाली नसती. सेलिब्रिटींच्या ट्वीट्सच्या चौकशीबाबत विचारले असता महाराष्ट्रातील सेलिब्रिटींच्या ट्वीटमध्ये ‘समानता’आढळली.यात सुनील शेट्टी हे आणखी एक नटसम्राट असल्याची टिका करीत त्यांनी तर भाजपच्या मोठ्या नेत्याला टॅग केले असल्याचे ते म्हणाले.सेलिब्रिटींच्या संवैधानिक अधिकारांबाबत आक्ष्ेप नाही मात्र महाराष्ट्रात एकेकाळी अंडरवर्ल्डचे साम्राज्य होते,सेलिब्रिटींना धमकावून खंडणी वसूल केली जात होती.,सेलिब्रिटींच्या मुद्दांवरुन भाजप व मोदी मूळ मुद्दांपासून लक्ष्य भरकटवत असल्याचा आरोप त्यांनी केला.अशी शंका आल्यानेच सेलिब्रिटींच्या ट्टीट्सच्या मागे कोण आहे याची चौकशी करण्याचा आदेश गृहमंत्र्यांनी दिला. सोशल मिडीयाचा वापर करुन कोणी काय पाप केले?या चौकशीचा आदेश भाजपला का झोंबला?भाजपला इतका कळवळा का?आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाबाबत जे ट्ठीट केलेत त्याबाबत विचारले असता,त्या ट्टीट्सबाबत माहिती नसून माहिती घेऊन सांगतो असे ते म्हणाले. विधान परिषदेत अद्याप १२ सदस्यांची नियुक्ती न झाल्याकडे लक्ष् वेधले असता,हा लोकशाहीचा खून असल्याची टिका त्यांनी केली.दिसायला आपले राज्यपाल खूप गरीब स्वभावाचे वाटतात मात्र आता आघाडी सरकारने यासाठी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.राज्यपालांच्या निर्णयामागे नेमके कोण आहेत,हे त्यामुळे कळू शकेल. पुढील विधानसभा अध्यक्ष् कोण?या प्रश्‍नावर बोलताना पुढील अर्थसंकल्प अधिवेशनात मार्चमध्ये निवडीची प्रक्रिया होईल तेव्हाच कळेल.शेतक-यांचे आंदोलन आणखी किती काळ चालेल?याबाबत बोलताना इंग्रजांच्या काळापेक्ष्ा ही वाईट स्थिती आली आहे असे सांगून देशात लोकशाही लागू झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शेतक-यांचे हे सर्वात मोठे आंदोलन असल्याचे सांगितले.या आंदोलनात अनेकांचे जीव गेले,शेतक-यांच्या मार्गावर खिळे ठोकण्यात आले,अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले,मोदी सरकारने तिन्ही कायदे रद्द केल्याशिवाय हे आंदोलन संपणार नाही,असे त्यांनी सांगितले. मोदींविराेधात वाराणसीतून लढणार का?या प्रश्‍नावर हसत मोदी हे देखील वाराणसीतले नाही असे सांगत मी लढवैय्याच आहे,पक्ष्ाने आदेश दिला तर कूठूनही लढणार असे ते म्हणाले. निवडणूक ईव्हीएम सोबतच बॅलेट पेपरने घेण्याचा अधिकार विधान सभेचा- कलम ३२८ नुसार राज्यातील निवडणूका या ईव्हीएमसोबतच बॅलेट पेपरने घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी विधी मंडळाचा असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील मतदारांचा हा संवैधानिक अधिकार कायम राहील.मी अगदी थोडा काळ विधान सभा अध्यक्ष् पदाच्या खूर्चीवर होतो मात्र देशाच्या दृष्टिने खूर्चीवर असताना महत्वाचे निर्णय घेता आले.यामुळे हा शेतक-याचा,कामगाराचा मुलगा चांगले काम करीत आहे हे सिद्ध झाले. ज्या-ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे तिथे बॅलेट पेपरने निवडणूका घ्यावी असे राहूल गांधी यांच्याशी बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी ‘नटसम्राट!’ गटातटात विखुलेली काँगेस याबाबत प्रश्‍न विचारला असता भाजपमध्येही मोदी-गडकरी,गडकरी-फडणवीस गट नाहीत का?असा प्रतिप्रश्‍न त्यांनीच केला.मोदी यांचा उल्लेख ‘नटसम्राट’असा केल्याचा खुलासा करताना २०१४ च्या निवडणूकीत मी याचा साक्ष्ीदार राहीलो असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानपदी वर्णी लागल्यानंतर संसेदच्या पायरीवर माथा टेकून लोकशाहीच्या त्या मंदिराला वंदन करणारे मोदी हे अडवाणीला मात्र विसरले! राज्यसभेत गुलाम नबी आजाद यांना निरोप देताना मोदी हे भावूक झाल्याचे संपूर्ण देशाने बघितले.कामगारांच्या,गरीब शेतक-यांच्या प्रश्‍नावर मोदी कधीच भावूक होताना दिसत नाहीत,देशात फक्त अंबानी आणि अदानी हे दोनच गरीब आहेत,अडवाणी यांनी मला काय सांगितले,याबाबत सार्वजनिकरित्या खुलासा करणार नाही मात्र मोदी हे गडकरींसाठीही भावूक होत नाही,अशी पुस्तीही त्यांनी जोडली.२६ जानेवारी रोजी जे घडले .शेतकरी नेते टिकैत यांच्या डोळ्यातून जे अश्रू निघाले ‘गोदी-मिडीयाला’ते दिसले नाहीत.माेदी यांना नटसम्राट ही उपाधी योग्यच असल्याचे त्यांनी सांगितले. (दि.11/2/2021)