नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

प्रीतीच्या लग्नात दोन भावांचा ऊर दाटून आला!

देवाभाऊ आणि सोबतचे सर्वेसर्वा संदीप जोशी यांच्या संकल्पाला मिळाले मंगलमय रूप मुख्यमंत्री फडणवीसांनी केले कन्यादान

नागपूर, ता. 20 ऑगष्ट 2026:- मंत्रोच्चार सुरू होते... मंगलाष्टकांचे स्वर वातावरणात घुमत होते... समोर प्रीती आणि शिवम आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी विवाहबंधनात अडकत होते. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रीतीचे कन्यादान करत होते तर दुसऱ्या बाजूला सोबतचे सर्वेसर्वा संदीप जोशी हा क्षण डोळ्यांत साठवत होते. काही क्षण असे आले की, या दोन भावांचा ऊर दाटून आला... डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूंनी पाणावल्या. कोरोनाकाळात पती गमावलेल्या प्रीतीच्या आयुष्यात आज पुन्हा संसाराची पालवी फुटली. सोबत पालकत्व प्रकल्पा’तील पहिला विवाह आज मोठ्या आपुलकीने आणि भावनिक वातावरणात पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रीतीचे कन्यादान केले. वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकत त्यांनी प्रीती आणि शिवम यांचे हात एकमेकांच्या हातात दिले आणि नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. प्रीतीच्या आयुष्यातील हा क्षण पाहताना मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठीही तो केवळ एका विवाहसोहळ्याचा क्षण नव्हता. कोरोनाकाळात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांसाठी सोबतच्या माध्यमातून सुरू केलेल्या प्रवासातील हे पहिले मोठे समाधान होते. त्यामुळेच प्रीतीचे कन्यादान करताना देवाभाऊ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर एका मोठ्या भावाचीच माया आणि समाधान दिसत होते. दोन भावांनी पाहिलेले स्वप्न आज साकारले कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबांनी आपले कर्ते पुरुष गमावले. त्यांच्या पत्नी आणि मुलांचे भविष्य अचानक अंधकारमय झाले. अशा वेळी नागपूरचे तत्कालीन महापौर संदीप जोशी पुढे आले. या कुटुंबांना केवळ मदतीचा हात न देता त्यांच्या आयुष्याची जबाबदारी स्वीकारण्याचा विचार त्यांनी मांडला आणि सोबत पालकत्व प्रकल्पाचा जन्म झाला. या उपक्रमात जवळपास २८९ कुटुंबांची नोंदणी झाली. यातील १०० कुटुंबांचे पालकत्व स्वतः स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. मुलांचे शिक्षण आरोग्य आणि इतर गरजा पूर्ण करण्याबरोबरच या कुटुंबांतील मुलींचे विवाह करून देण्याचा संकल्पही करण्यात आला. हा संकल्प दोन मित्रांचा होता; पण आज तो दोन भावांचा वाटत होता. प्रीतीच्या लग्नात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हा गेल्या काही वर्षांच्या प्रवासाची पावती देत होता. मंत्रोच्चार सुरू असताना संदीप जोशी यांचा ऊर भरून आला. डोळ्यांत आनंदाश्रू तरळले ज्या मातांना सोबत देण्याचा संकल्प केला त्यातील एका बहिणीचे आज घर बसताना पाहण्याचा आनंद त्यांच्या भावनेतून स्पष्ट जाणवत होता. सोबतच्या बहिणीसाठी भावाने केला पाहुणचार संदीप जोशी आणि त्यांच्या पत्नी देवयानी जोशी यांनी या विवाहसोहळ्यात आलेल्या प्रत्येक पाहुण्याचे अगदी घरच्या लग्नाप्रमाणे स्वागत केले. सोबत परिवारातील सर्व एकल मातांचा भाऊ म्हणून संदीप जोशी प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष देत होते. प्रीतीचे लग्न म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपल्या घरातीलच बहिणीचे लग्न होते. त्यामुळे पाहुण्यांचे स्वागत आदरातिथ्यापासून विवाहातील प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवस्थेपर्यंत ते स्वतः लक्ष देत होते. प्रीती आमची मुलगी...विवाहानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावनिक भावना व्यक्त केली. आज प्रीती जी आमची मुलगी आहे, तिचा विवाह होताना मला विशेष समाधान वाटत आहे असे ते म्हणाले. गेल्या काही वर्षांत या कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासह त्यांच्या इतर गरजांकडे सातत्याने लक्ष देण्यात आले. पुढील काळात या सर्व कुटुंबांमधील जवळपास ३०० मुलींचे विवाह होईपर्यंत त्यांची संपूर्ण जबाबदारी संदीपजींच्या नेतृत्वाखाली स्वीकारली आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अत्यंत कमी वयात कठीण परिस्थितीला सामोरे गेलेल्या मुलींच्या आयुष्यात स्थैर्य आणि आनंद आणण्याचे हे कार्य समाधान देणारे असल्याचे सांगत त्यांनी संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा क्षण सोबत प्रकल्प हाती घेतल्यानंतर मी केलेल्या संकल्पाची सिद्धी होते आहे, हा माझ्यासाठी आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा क्षण आहे असे संदीप जोशी यांनी सांगितले. एकल मातांच्या मुलांच्या आरोग्याची आणि शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता या मातांचा पुनर्विवाह आणि परिवारातील मुलींचे विवाह सर्व समाजसेवी लोकांच्या सोबतीने पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कुटुंबांची जबाबदारी स्वीकारली ही त्यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वाची ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले. एका लग्नाने दिली नव्या प्रवासाची दिशा आज प्रीती आणि शिवम विवाहबद्ध झाले. प्रीतीच्या दोन मुलांसह शिवमने तिचा स्वीकार केला. मुख्यमंत्र्यांनी कन्यादान केले आणि सोबत परिवारातील या मुलीला आशीर्वाद दिला. एका आईच्या आयुष्यात पुन्हा संसार फुलला दोन मुलांना पुन्हा कुटुंबाची सावली मिळाली आणि दोन भावांनी, देवाभाऊ आणि संदीप जोशी यांनी घेतलेल्या एका मोठ्या संकल्पाची पहिली पूर्तता झाली. प्रीतीच्या लग्नातील हा आनंद केवळ एका कुटुंबाचा नव्हता... तो सोबत परिवारातील प्रत्येक आईचा प्रत्येक मुलाचा आणि माणुसकीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा होता. एकमेकांची साथ देत आयुष्याची नवी सुरुवात करू आजचा दिवस आमच्या दोघांसाठीही आयुष्यातील अत्यंत आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण आहे. एकमेकांना समजून घेत, सुख-दुःखात साथ देत आयुष्याचा हा नवा प्रवास सुरू करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. सोबत परिवाराने दिलेली मायेची स
साथ आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेले कन्यादान आमच्यासाठी कायम स्मरणात राहील. आमच्यावर विश्वास ठेवून आयुष्याची नवी सुरुवात करून देणाऱ्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो. शिवम व प्रीती